Wednesday 25 August 2021

कोकणाला विकास मंडळ द्या

डॉ. भालचंद्र मुणगेकर

नैसर्गिक साधनसामग्रीत समृद्ध; परंतु आर्थिक विकासात उपेक्षित असलेल्या कोकणाचा विकास करण्यासाठी, 'कोकण प्रादेशिक विकास मंडळ' स्थापणे हाच पर्याय आहे. त्यासाठी सर्व कोकणी जनतेने संघटितपणे सरकारशी संवाद साधणे आणि आवश्यक झाल्यास दबाव आणणे अपरिहार्य आहे. clck link more information

https://maharashtratimes.com/editorial/develop-the-konkan-which-is-neglected-in-economic-development-the-only-option-is-to-set-up-a-konkan-regional-development-board-/articleshow/85417031.cms 

अतिवृष्टी, ढगफुटी व उपायांची पंचसूत्री

बुधवारी 21 जुलै आणि रात्री बारानंतर सुरू होणारा गुरुवारचा (22 जुलै) कमी वेळातील जास्त पाऊस अशी मोजदाद करता महाराष्ट्रात 30 पेक्षा जास्त ठिकाणी अवघ्या चोवीस तासांत अभूतपूर्व ढगफुटींचा वर्षाव झाला; पण भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) या सर्व ढगफुटी नाकारल्या आहेत. हा जीवघेणा पाऊस म्हणजे अतिवृष्टी किंवा महावृष्टी असल्याचे म्हटले आहे.

ढगफुटींमुळे शेती व शेती संलग्‍न इतर जोडधंदे, व्यवसाय-उद्योग यांना फार मोठा फटका बसला आहे. केवळ महाराष्ट्र नव्हे तर एकंदर देशाच्या अर्थव्यवस्थेला ढगफुटींमुळे मोठा फटका बसणार आहे. म्हणून याकडे गांभीर्याने पाहण्याची, तसेच कृतीशील ठोस निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याची गरज आहे. येत्या काळात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रत्येक व्यक्‍तीला या आपत्तीची किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे ‘पार्टी पॉलिटिक्स’मधून बाहेर पडून ‘नेशन फर्स्ट’ असे समजून सर्व घटकांनी कार्यरत होण्याची गरज आहे. कारण, कोरोनाच्या संकटासारखीच हीसुद्धा एक राष्ट्रीय आपत्तीच आहे.

Click more information

https://pudhari.news/sampadakiy/12275/%e0%a4%85%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%a2%e0%a4%97%e0%a4%ab%e0%a5%81%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%b5-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80/ar 

डोंगर घरात येतो तेव्हा...

- राजीव मुळ्ये, पर्यावरण अभ्यासक

काल माळीण… आज तळीये, आंबेघर, पोसरे… भूस्खलन आणि दरड कोसळणे कालही होते आणि आजही आहे, पण काल एकच गाव होते; आज असंख्य गावे आहेत. कणखर सह्याद्री जागोजागी खचू लागलाय आणि अशा घटनांचा गुणाकार होतोय. डोंंगर भुसभुशीत करण्यास अनेक घटक कारणीभूत ठरत आहेत आणि त्यावर उपाय शोधणे अत्यावश्यक ठरलेय.

Click more information

https://pudhari.news/latest/15215/%e0%a4%a1%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b0-%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%8b-%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be/ar 

आपत्तींची वर्गवारी

click link more information

https://marathivishwakosh.org/11911/ 

आपत्ती व्यवस्थापन चक्र

अनंत काळापासून पृथ्वीतलावर आपत्ती कोसळत आल्या आहेत. वारंवार येणाऱ्या आपत्तींपैकी काही नैसर्गिक असतात, तर काही मानवनिर्मित असतात. आपत्तींमुळे होणारी जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी किंवा त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची प्रणाली अलीकडे सगळ्याच देशांनी कार्यरत केली आहे. आपत्ती व्यवस्थापन चक्र हे आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रणालीमधील एक महत्त्वाचे आणि मूलभूत तत्त्व आहे. आपत्तींमुळे होणारी हानी टाळायची असेल, तर आपत्ती उद्भवायच्या अगोदरपासूनच आपत्तींचा अंदाज घेणे, आपत्तींविरोधी प्रतिबंधात्मक उपाय योजणे, आपत्तींचे उपशमन आणि आपत्तिदरम्यान योग्य बचावासाठी कार्यवाही हाती घेणे इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. या सर्व कार्यवाहींची कल्पना खाली दर्शविलेल्या ‘आपत्ती व्यवस्थापन चक्रा’वरून (‘आपत्ती व्यवस्थापन मालिके’वरून) येईल.

click more information →

https://marathivishwakosh.org/11934/ 

Thursday 19 August 2021

धरणे व बंधारे

धरणे व बंधारे : नदीच्या अथवा कुठल्याही जलप्रवाहाच्या पात्रात पाण्याचा प्रवाह अडवून त्याचा मोठ्या प्रमाणावर साठा करण्यासाठी बांधण्यात येणारी भिंत म्हणजे धरण होय. धरण हे योग्य स्थळी जलप्रवाहाच्या खोऱ्याच्या एका काठापासून दुसऱ्या काठापर्यंत बांधलेली एक विस्तृत भिंतच असते. पुष्कळ वेळा धरणावरून वाहतूक करण्यासाठी योग्य रुंदीचा रस्ताही ठेवतात. ही भिंत जर कमी उंचीची असेल (आणि तीवर पाण्याचा साठा करण्याकरिता लोखंडी दारे बसविलेली असतील), तर त्याला बंधारा म्हणतात. अनेक वेळा लहान मोठ्या नाल्यामधून वाहत्या पाण्याची पातळी उंचावणे आणि ते वळविणे यांकरिता जलप्रवाहाच्या पात्रात जी लहान भिंत बांधतात तिला लघुबंधारा म्हणतात. लघुबंधाऱ्याला लोखंडी दारांची आवश्यकता नसते. तसेच यामुळे होणारा पाण्याचा साठा अतिशय कमी प्रमाणात असतो. पावसाळ्यात पूराच्या वेळी संपूर्ण बंधाऱ्यावरून तसेच लघुबंधाऱ्यावरूनही पाणी वाहते. या उलट धरणाच्या बांधणीमध्ये धरणाच्या एकूण लांबीपैकी फक्त काही विवक्षित लांबीवरूनच पाणी वाहू देण्याची मुभा असते धरणाचा बाकीचा भाग हा जलाशयाच्या पाण्याच्या कमाल पातळीच्यावर काही उंचीपर्यंत बांधलेला असतो.

इतिहास : धरणांचा इतिहास फार पुरातन आहे. प्राचीन काळी इजिप्त, मेसोपोटेमिया, चीन आणि भारत या देशात कोरड्या ऋतूंत शेतीसाठी व माणसांच्या उपयोगासाठी आणि पुरांपासून संरक्षण करण्याकरिता अनेक धरणे बांधली गेली होती.

नाईल नदीवरील कोशेश येथे इ. स. पू. २९०० च्या सुमारास बांधलेले १५ मी. उंचीचे धरण हे सर्वांत प्राचीन धरण मानण्यात येते. हे धरण मीनीझ या राजाच्या मेंफिस येथील राजधानीला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधले होते. ईजिप्तमधील इ. स. पू. २७०० च्या सुमारास नाईल नदीवर बांधलेले साद-एल्-काफारा नावाचे दगडी धरणही जगातील एक जुने म्हणून मानण्यात येते व या धरणाचे अवशेष अद्यापही पहावयास मिळतात. ते धरण कैरोपासून सु. ३० किमी. अंतरावर होते आणि त्याची लांबी १०६ मी. व उंची १५ मी. होती. हे धरण बांधल्यानंतर थोड्याच काळात सांडव्याच्या अभावी पुरामुळे पडले व त्यानंतर अनेक शतके ईजिप्तमधील लोकांनी दगडाची धरणे बांधली नाहीत. अद्यापही उपयोगात असलेले सर्वांत जुने धरण सिरियातील ओराँटीझ नदीवरील असून ते ६ मी. उंचीचे व दगडी भरावाचे आहे.

Clicklink more information

https://vishwakosh.marathi.gov.in/19218/