Sunday 31 July 2022

Indias journey From SLV-3 to world class gslv


Click Link 

https://tfipost.com/2022/06/indias-journey-from-a-humble-slv-3-to-world-class-gslv-mk-iii/amp/ 

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास : भारत इंग्रजी अंमलाखाली आल्यानंतर स्वातंत्र्य संपादनार्थ घडलेला इतिहास. बंगालचा नवाब सिराज उद्दौला याचा बंगालमधील प्लासी या गावाजवळ २३ जून १७५७ रोजी झालेल्या लढाईत [⟶ प्लासीची लढाई] ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पराभव केला आणि कलकत्ता शहर व २४ परगणा जिल्हा यांचे चिमुकले राज्य स्थापिले. या राज्याचा विस्तार शीख सत्ता नष्ट होईपर्यंत (१८४९) चालू राहिला. अखेरीस भारताच्या इतिहासातील एक सर्वांत मोठे व बलाढ्य असे ब्रिटिश साम्राज्य उभे राहिले . पाचही  खंडांत पसरलेल्या विशाल ब्रिटिश साम्राज्याचा हिंदी साम्राज्य हा एक भाग होता. त्याची इतरही अनेक वैशिष्टये होती : आधीच्या सर्व परकी राज्यकर्त्यांनी येथे स्थायिक होऊन भारतीय शेती व उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे आर्थिक भरभराट होत राहिली. ब्रिटिश काळात परिस्थिती उलटी झाली. ग्रेट ब्रिटनमधील कारखान्यांत तयार होणाऱ्या मालाला भारत ही हुकमी बाजारपेठ मिळाली. त्यामुळे इथले उद्योग बुडाले, जमिनीचा सारा वाढला आणि शेतीसाठी दरवर्षी जी कर्जे घ्यावी लागत, त्यांचे लेखी व्यवहार सुरू झाले. या व्यवहारात निरक्षर शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांच्या मालकीच्या बनल्या. देशाचा कोणत्या ना कोणत्या तरी भागात दुष्काळ आणि भूकबळी ही नित्याची बाब होऊन बसली.

Click link for more information


https://vishwakosh.marathi.gov.in/30096/ 

Tuesday 26 July 2022

पांडव (पांडू) लेणी, नाशिक

पश्चिम भारतातील एक महत्त्वाचा हीनयान (थेरवाद) व महायान लेणी-समूह. या लेणी नाशिक शहरापासून पश्चिमेला सुमारे ८ किमी. अंतरावर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत आहेत. येथे तीन टेकड्या असून त्यांपैकी त्रिकोणी आकाराच्या ‘त्रिरश्मी’ टेकडीवर लेणी खोदल्या आहेत. लेणींतील शिलालेखांमध्येही ‘त्रिरश्मी’ या नावाची प्राकृत रूपे ‘तेकिरसी’ व ‘तिरन्हु’ अशी आली आहेत. स्थानिक लोक या लेणींना ‘पांडव (पांडू) लेणी’ या नावाने ओळखतात.

पांडव लेणींचा अभ्यास जे. विल्सन (१८४७-४८), जे. स्टीव्हन्सन (१८५३), एडवर्ड वेस्ट व ऑर्थर वेस्ट (१८६७-६८), फर्ग्युसन व बर्जेस (१८८०), भगवानलाल इंद्रजी (१८८३), वॉल्टर स्पिंक (१९५४), ट्राबोल्ड (१९७०), दहेजिया (१९७२), ढवळीकर (१९७४, १९८४ व १९८६), वीनर (१९७७), जाधव (१९८०), एस. नागराजू (१९८०-८१), अलोने (१९८८), अ. जामखेडकर (२००२), मंजिरी भालेराव (२००९) इ. संशोधकांनी केला आहे.

पांडव लेणी प्रामुख्याने बौद्ध धर्माच्या हीनयान व महायान पंथांच्या कालखंडात खोदण्यात आली. येथे एकूण २७ ब्राह्मी शिलालेख कोरले असून त्यातून सातवाहन व पश्चिमी क्षत्रप (क्षहरात) यांच्या इतिहासाविषयी उपयुक्त माहिती मिळते. या लेणी-समूहात एक चैत्यगृह असून बाकीचे सर्व विहार आहेत. साधारणपणे येथील विहारांची ओसरी, मंडप व सभोवताली खोल्या अशी स्थापत्य-रचना आढळून येते. येथील स्तंभांचा घटकक्रम साधारणपणे अष्टकोनी स्तंभ, घंटाशीर्ष, आमलकयुक्त चौरसाकृती घटक, त्यावर स्वारशिल्प आणि कठडा असा आहे. साधारणपणे इ. स. पू. पहिल्या शतकापासून ते इ. स. सातव्या शतकापर्यंत येथे लेणी संबंधित कार्य सुरू होते. मूळच्या हीनयान लेण्यांत नंतर सुमारे सहाव्या शतकात महायान परंपरेसाठी आवश्यक असे बदल करण्यात आले. बऱ्याचशा लेण्यांत बौद्ध शिल्पे कोरण्यात आली आहेत. यातील गौतम बुद्ध यांची शिल्पे स्थानक, प्रलंबपादासन, पद्मासन, सिंहासन तसेच ध्यानमुद्रा, धर्मचक्रप्रवर्तनमुद्रा, वरदमुद्रा व महापरिनिर्वाणमुद्रेत कोरण्यात आली आहेत. सोबत बोधिसत्त्वांची (पद्मपाणी, वज्रपाणी, मैत्रेय इ.) शिल्पेही पाहावयास मिळतात. येथे एकंदरीत २४ लेणी असून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने या उत्तराभिमुख लेणींना पूर्वेकडून पश्चिमेकडे अनुक्रमांक दिले आहेत.

https://marathivishwakosh.org/49654/