Saturday 16 January 2021

मौर्यकाल

मौर्यकाल: इ. स. पू. चौथ्या शतकाच्या अखेरीस भारतातील प्राचीन मगध देशात मौर्य वंश उद्यास आला. या वंशातील राजांनी इ. स. पू. ३२१ ते १८५ दरम्यान भारतखंडाच्या बहुतेक भागावर राज्य केले आणि प्रथमच एकछत्री अंमल प्रस्थापित केला. या काळाला मौर्यकाल ही सर्वसाधारण संज्ञा देतात. या काळात जमात राज्ये किंवा महाजनपदे आणि लहान लहान राज्ये यांच्या जागी एक मोठे साम्राज्य उत्पन्न झाले. यापूर्वीचे नंद घराण्याचे राज्य फक्त उत्तर भारतापुरते, त्यातल्या त्यात गंगा-यमुनांच्या दुवेदीत व त्याच्या आसपासच्या प्रदेशापुरते मर्यादीत होते. त्याचा विस्तार करून ते बव्हंशी भारतभर पसरविण्याचे काम मौर्य वंशातील राजांनी विशेषतः चंद्रगुप्ताने केले. पुढे या साम्राज्याला आणि शासनयंत्रणेला काही उच्च जीवन मूल्ये व नैतिक अधिष्ठान त्याच्या नातवाने–सम्राट अशोक–याने दिले. यामुळे मौर्य साम्राज्याला एकूण भारतीय जीवनात एक विशिष्ट स्थान प्राप्त झाले आहे.

खालील लिंक वर click kara

https://vishwakosh.marathi.gov.in/30609/ 

No comments:

Post a Comment