B N A S C College established in the year 1990 , College library have updated 24542 Books and Journals collection and 902 user.
Friday, 30 April 2021
Thursday, 29 April 2021
मुख्य परीक्षा भूगोल अभ्यासक्रमाची मांडणी
अभ्यासाच्या सोयीसाठी आयोगाने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमाची वेगळ्या प्रकारे मांडणी करून घेणे व्यवहार्य ठरेल
Wednesday, 28 April 2021
Tuesday, 27 April 2021
आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५
भारत जसा जैव, सांस्कृतिक व भौगोलिक वैविध्यांचा देश आहे, तसाच तो नानाविध विनाशकारी आपत्तींचा देश म्हणूनही गणला जातो. भारतातील आपत्तींचे विस्तृत प्रमाण येथील विकासाला मोठ्या प्रमाणात बाधक ठरते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल ५८ वर्षानी आपत्ती व्यवस्थापन कायदा (कायदा क्र. ५३/२००५) झाल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन या अतिशय महत्त्वाच्या विषयाला वैधानिक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याकरवी एका सुनियोजित, सर्वसमावेशक व चिरंतन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडे वाटचाल करण्याच्या दिशेने आपण भक्कम पाउल टाकले आहे.
जगभरातील आपत्तींच्या घटना २० व्या शतकातील आठव्या दशकात खूप वाढल्या होत्या. प्राणहानी आणि वित्तहानी शिगेला पोहोचली होती. २० व्या शतकातले शेवटचे दशक हे राष्ट्र संघाने आपत्तीचे धोके कमी करण्यासाठी ‘डिझास्टर रिस्क रिडक्शन’चे दशक म्हणून घोषित केले होते. सगळ्या राष्ट्रांनी आपापल्या व्यवस्थापनानुसार दंडक स्थापन करण्याचा प्रयत्न केला. धोका कमी करण्यासाठी अनेक दंडक जगभरात स्थापन केले गेले. जगभरात एक गोष्ट निश्चित मानली गेली की, आपत्ती आल्यानंतर केल्या गेलेल्या कार्यवाहीपेक्षा धोका कमी करण्यासाठी केलेली कार्यवाही महत्त्वाची असते. भारतात १९९३ साली ओरिसा (ओडिशा)च्या चक्रीवादळानंतर केंद्र सरकारने एक समिती स्थापन करून धोक्यांचा आणि त्यापासून उद्भवणाऱ्या आपत्तींचा सर्वंकष अभ्यास केला. तसेच भारताने आपत्तिदरम्यान मदतकार्यासाठी व्यवस्थापनातील सगळे विभाग, शास्त्रीय संशोधनातील संस्था, शिक्षण संस्था आणि सामान्य जनसमुदाय तसेच बचावकार्य करणाऱ्या संस्था यांच्यात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु २००४ साली आलेल्या त्सुनामीमुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा बनवण्याची निकड कळून चुकली.
आपत्ती व्यवस्थापन कायदा (२००५) हा संसदेत २५ डिसेंबर २००५ रोजी पारित झाला. या कायद्याची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :
Click link for more information
एल निनो
दक्षिण अमेरिकेच्या उष्णकटिबंधीय पश्चिम किनार्यावरील महासागरी प्रदेश दर काही वर्षांनी असंगत असा उबदार राहतो. या असंगत आविष्काराला महासागरविज्ञान आणि हवामानशास्त्रात एल निनो म्हणून ओळखले जाते. पृथ्वीचे वातावरण आणि पॅसिफिक महासागराच्या उष्णकटिबंधीय भागातील पाणी यांच्यामधील आंतरक्रिया हा एक वातारणीय आविष्कार एल निनोच्या रूपाने घडत असतो. २०० उत्तर ते २०० दक्षिण या अक्षांशांदरम्यान घडणारा हा आविष्कार दर सु. २ ते ७ वर्षांनी घडतो. सर्वसाधारणपणे याची सुरुवात एका वर्षाच्या उन्हाळ्याच्या प्रारंभी होते व पुढील वर्षातील वसंत ऋतूपर्यंत तो असतो. एल निनोचा परिणाम जगभरातील जलवायुमानावर (हवामानावर) होतो. उदा., अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या दक्षिण भागातील जलवायुमान नेहमीपेक्षा अधिक आर्द्र (दमट) होते, तर वायव्य पॅसिफिक महासागरात ते नेहमीपेक्षा अधिक कोरडे (शुष्क) होते. सु. १९८२-८३ पासून हा आविष्कार अधिक वेळा व अधिक प्रखर होत गेलेला आहे. एल निनोचा हा वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार सु. १८ महिने राहतो आणि पुष्कळदा त्याच्यानंतर विरुद्ध प्रकारचा ‘ला निना’ (La Nina) हा आविष्कार घडतो. ला निनाचा प्रभाव सामान्यपणे डिसेंबर ते मार्च दरम्यान असतो. विसाव्या शतकात एल निनो २३ वेळा व ला निनो १५ वेळा घडल्याचे मानतात.
Sunday, 25 April 2021
Tourism Industry Key to Faster Economic Growth
The tourism industry of India is economically important and is growing rapidly. It has become the world's fourth largest export industry after fuels, chemicals and food. Specifically, tourism accounts for 6 per cent of the world's total merchandise and service exports that represents 30 per cent of international trade in services. Besides, 9.8 per cent of the world's total gross domestic product (GDP) originates from the tourism sector. The infiuence of inbound tourism on national economies is becoming increasingly important because of the growing size of the tourist market. Inbound tourism stimulates economic growth in numerous ways. For instance, tourism significantly contributes to foreign exchange reserves which help in bringing new technologies for production process. Secondly, tourism stimulates investments in new infrastructure, human capital and increases competition. Thirdly, tourism promotes industrial development through spillover effects and creates jobs and hence stimulates earnings, thereby generating positive economic externalities.
click link more information
http://employmentnews.gov.in/NewEmp/MoreContentNew.aspx?n=Editorial&k=30217